‘किर्लोस्कर नाटक मंडळी’ची स्थापना करून महाराष्ट्रात संगीत नाटकांचे नवे युग निर्माण करणारे बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा ३१ मार्च हा जन्मदिन. १८८२ साली त्यांनी ‘संगीत सौभद्र’ हे स्वतंत्र संगीत नाटक लिहून रंगभूमीवर आणलं आणि त्या नाटकाने इतिहासच घडवला. सुविहित कथानक, नैसर्गिक संवाद, आकर्षक व्यक्तिरेखा, सुंदर मधुर पदं आणि उपरोधात्मक विनोदाची पेरणी अशा वैशिष्ट्यांमुळे या नाटकाची मोहिनी आजही कायम आहे. अण्णासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त, या नाटकातील ‘राधाधरमधुमिलिंद जय जय’ या पदाच्या, ज्येष्ठ कलावंत डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी केलेल्या सादरीकरणाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या संग्रहातील व्हिडिओ शेअर करत आहोत. याचे संगीतही अण्णासाहेबांनीच दिलेले आहे.
(अण्णासाहेब किर्लोस्करांविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. डॉ. रवींद्र आणि डॉ. वंदना घांगुर्डे या संगीत रंगभूमीवरील सेवाव्रती दाम्पत्याची खास मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)